मोबाईल मेसेजेस
पाठविणारे आणि वाचणारे यांच्यासंबंधी काही संशोधन होण्याची गरज आहे. तेच ते मेसेज
पुन्हा पुन्हा वाचल्यावर काय परिणाम होतो, लांबलचक मेसेज वाचण्याचे काय परिणाम होऊ
शकतात. आपलाच मेसेज दुसऱ्याच्या नावाने आलेल्या पाहून मनाची अवस्था काय होते. मेसेज
पाठिणाराची बोटे, मेंदू, मन यांची अवस्था काय होते, सतत कॉपी पेस्ट केल्याने काय
होऊ शकते... असे बरेच संशोधन करण्यास वाव आहे. अलीकडे इंटरनेट पॅक स्वस्त झाल्याने
कोणाला बिलाची भिती वाटत नाही, मात्र, याचा संबंध कोणी जर दिलाशी जोडला तर मात्र
फरक पडू शकतो. संशोधकांनी कृपया मनावर घ्यावे.
सध्या व्हॉटसअप,
अन्य एसएमएस आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छांचा मारा सुरू
आहे. होय माराच म्हणावा लागेल. एकच संदेश अनेकांकडून वारंवार येत असेल तर त्याला
काय म्हणावे. अर्थात शुभेच्छा देणाऱ्यांच्या भावनाही तेवढ्याच महत्वाच्या असून
त्यांचा अवमान करण्याचा मुळीच हेतू नाही. पण अलीकडे मोबईलमध्ये इंटरनेट आल्यापासून
आणि स्वतातील नेट पॅक उपलब्ध झाल्यापासून लोक बिनधास्त मेसेजेस पाठवत राहतात. साणसुदीच्या
दिवसांत दिवसरात्र संदेशांचा भडीमार सुरू असतो. चित्रे, लक्षवेधक शब्दरचना, दोन्हींचे
मिश्रण, स्माइलीज यांचा समावेश असलेली काही थोडक्यात तर काही लांबलचक शुभेच्छांचे
संदेश सध्या मोबाईलवर येऊन धडकत आहेत. अर्थात यात स्वतःच्या कल्पकतेला फारसा वाव
नसतो. आपल्याला कोठून तरी आलेल्या मेसेज पुढे पाठवायचाच असा सर्वांचा शिरस्ता. ज्याने
हा मेसेज पाठविला, त्यालाही तो पुन्हा अनेकांकडून येतो. अनेकदा त्यात सोयीनुसार
बदल करून, आपले घुसडून पुढे पाठविणारे महाभागही असतात, तर दुसऱ्याचे नाव न वगळता
त्याच्याच नावाने शुभेच्छा देणारेही अनेक असतात.
भविष्यात यासंबंधी
संशोधन व्हायची गरज आहे. अलीकडे आपल्याकडे एक पद्धत आहे. कोणत्याही गोष्टीवर
संशोधन करून त्याचे फायदे-तोटे लोकांना सांगितले जातात. उदाहरणार्थ जास्तवेळ
टीव्ही पाहण्याचे परिणाम, मोबाईल वापराचे परिणाम, आकमूक तमूकचे सेवन केल्यावर काही
होते, ऑफिसात बैठे काम केल्यावर काय होते, ताणतणाव कशाने वाढतो, कोणत्या गोष्टींचा
माणसाच्या मनावर काय परिणाम होतो..... असे बरेच काही संशोधन सुरू असते. तसेच एकदा
या मेसेजेसच्या बाबतीत होऊन जाऊ देत... तेच ते मेसेज पुन्हा पुन्हा वाचल्यावर काय
परिणाम होतो, लांबलचक मेसेज वाचण्याचे काय परिणाम होऊ शकतात. आपलाच मेसेज
दुसऱ्याच्या नावाने आलेल्या पाहून मनाची अवस्था काय होते. मेसेज पाठिणाराची बोटे,
मेंदू, मन यांची अवस्था काय होते, सतत कॉपी पेस्ट केल्याने काय होऊ शकते... असे
बरेच संशोधन करण्यास वाव आहे. अलीकडे इंटरनेट पॅक स्वस्त झाल्याने कोणाला बिलाची
भिती वाटत नाही, मात्र, याचा संबंध कोणी जर दिलाशी जोडला तर मात्र फरक पडू शकतो.
संशोधकांनी कृपया मनावर घ्यावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा